मृत्यू हे एक निविर्वाद सत्य
आरोग्य-स्वस्थता जितकी जास्त चांगल्या प्रतीची व जास्त काळाची, तेवढं जीवनमान जास्त. विस्कळ जेवढी जास्त काळाची व तीव्र, तेवढं जीवनमान कमी.
एक वेळ अशी येते की आरोग्य टिकवण्याच्या रस्सीखेचीत माणूस दमतो. मागं पडतो. व्याधी सरसावतात. त्याच्यावर कब्जा करतात, युद्ध चालू रहातं आणि जेव्हा व्याधी माणसावर पूर्ण नियंत्रण मिळवतात तेव्हा माणसाचा मृत्यू होतो.
मृत्यू सर्व सजीवांना अटळ आहे. केव्हा-कसा तो येईल हे सांगता येत नाही.
||रामनाम सत्य है॥
